लहानपणी किल्ला केल्यावर सतत पाणी न मारल्याने माती दुभंगली जायची पण मनं मात्र कधीच दुभंगली नाहीत, कारण मनं न दुभंगणं हे सजीवतेचं लक्षण होतं तर कोरडेपणा असणं हे निर्जीवतेचं. ह्याच ओलावा जपणाऱ्या नात्याला आपण सण म्हणतो, कारण रोज एकत्र नसलो तरी एकत्र आल्यावर कोरडेपणाची दरी कधीच दिसत नाही, तर असतो तो एकत्रपणाचा गोडवा...